मुक्ताईनगर :- तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथील रवींद्र विष्णू पाटील वय 26 या युवकाने आपल्या शेतात बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.
मुक्ताईनगर पोलिसात फिर्यादी ईश्वर विष्णू पाटील या राहणार चिंचखेडा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्याचा भाऊ रवींद्र विष्णू पाटील वय 26 हा सकाळी शेतात गेलेला होता. चिंचखेडा बुद्रुक शेती शिवारातील गट नंबर 136 मध्ये तो गेलेला असताना साडेआठ वाजेच्या सुमारास सोमवारी सकाळी शेतातच गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. मुक्ताईनगर पोलिसात त्याच्या खबरीवरून अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस नाईक संदीप खंडारे करत आहे.