ग्रा.पं.निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ खडसेंचं पहिलं ट्विट, म्हणाले…

0

जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून भाजप आणि महाविकासआघाडी अशा दोन्ही बाजुंनी मुक्ताईनगरमध्ये आपलेच वर्चस्व असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांनीही सोमवारी कोथळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले होते. कोथळी गावात भाजपचा विजय झाल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांनी विजयी झालेले उमेदवार नाथाभाऊंना मानणारे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला होता.


त्यानंतर आता एकनाथ खडसे यांनी ट्विट करुन मुक्ताईनगरमध्ये महाविकासआघाडीला 71 ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाल्याचे सांगत मोठ्या विजयाचा दावा केला आहे. तसेच त्यांनी विजयी शिलेदारांचे अभिनंदनही केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.