जळगाव (रजनीकांत पाटील) :– कोरोनाचे संक्रमण पाहता कडक नियम असून देखील काही नागरिक बेफिकर शहरातून ग्रामीण भागाकडे येणारा नागरिक हा घरात ठरत नसतो रिकामं राहून त्याचे देखील वळण आता चुकत चालले आहे.
आला उन्हाळा अक्षय तृतीय (आखाजी) चा सण यायच्या अगोदर हा पत्ते खेळायला सुरवात झाली असते मग सर्व मिळुन गावाबाहेर पत्त्यांचा डाव त गावोगावी खेडो पाळी असणारे रिकामटेकड्याचं वळण जुगार पत्यांनकडे आता चांगल्याच प्रकारे रमले आहेत.
चांगल्या च प्रकारे खेडो पाळी पत्ते/ जुगार यांना चालना मिळाली आहे संचारबंदी/जमावबंदी/लॉकडाउन हे सगळे नियम ठेवले धाब्यावर ठेवत रंगतो पत्याचा डाव गावात पोलीस प्रशासनाची गाडी फिरकत असते या धाकाने जुगार खेळण्यासाठी दिवसाढवळ्या गावापासून लांब अंतरावर जाऊन आपला डाव मांडत आहे. गावाबाहेरील पटांगण तसेच शेतात यांचा डाव मांडला असतो यात बाहेर गावाहून येणारे काही होम होम कॉरंटाइन यांचा देखील समावेश असतो यात बसून खेळला जाणार डाव यावर कुठल्याही पोलीस अथवा अधिकाऱ्याची गाडी आली असता पळ काढायला सहज जमेल या मुळे पैशाचा व्यवहार हा ऑनलाईन गुगल पे/फोन पे अथवा कागदावर टीप मार करून केला जातो या बाबत कोरोनासारख्या बिकट परिस्थितीत देखील काही नागरिक आपल्या जीवाची पर्वा न करता 10 ते 15 जन मिळून खेळ रमवतात यात पैसा चा होणार चुराळा तसेच सुरक्षित अंतर न ठेवता खेळला जाणार खेळ यात नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण हाऊ शकतो या बाबत पोलीस प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे.