भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील गुढे गावाजवळ गिरणा धरणाचा जामदा डावा कालवा हा आज पाच वाजेच्या सुमारास फुटल्याची घटना घडली आहे.
जामदा डावा कालवा फुटल्याने पाणी मोठ्याप्रमाणात वाया गेले. तर रब्बी हंगामाच्या शेवटच्या आवर्तनाची वाट अवघड झाली आहे. कालव्यावरील जलसेतुची भिंत तुटली आहे. कालवा फुटल्याबरोबर जामदा बंधार्यातून कालव्याचा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याचे गिरणा पाटबंधारेचे अधिक्षक अभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी दैनिक लोकशाही शी बोलताना सांगितले.
दरम्यान, हा कालवा अचानाक कसा फुटला याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. अधिकार्यांना याबाबत अहवाल दिला होता का? याकडे दुर्लेक्ष झाले का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.