चाळीसगाव दि.,5 –
तालुक्यातील गणेशपूर येथे 20 वर्षीय नव विवाहीतेने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना घडली.चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार औरंगाबाद जिल्हा कन्नड तालुक्यातील तांदुळवाडी येथील माहेर असलेल्या सविता मोरे (वय 20) हिचा विवाह चार महिन्यापूर्वी चाळीसगाव तालुक्यातील गणेशपुर येथील पॅजो रिक्षा चालक विजय मोरे यांच्याशी झाला होता.काल दि.4 रोजी पती विजय मोरे हे रिक्षा घेवुन शेतमजुर सोडण्यासाठी घरुन निघुन गेले होते.गणेशपुर गावी घरी विवाहीता सविता व तिची सासु घरी होत्या. सविता स्वयंपाक करीत असताना सासु या सकाळी 11 वाजेच्या सुमारास शौचास गेल्या तिकडुन परत आल्यावर सविता ही गळफास घेतलेल्या स्थितीत दिसल्याने त्यांनी आरडाओरडा केला असता परीसरातील रहिवासी धावून आले व त्यांनी सविताला चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी तपासुन त्यांना मृत घोषीत केले.
या घटनेची माहीती मिळाल्यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड, ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे व पोलीस कर्मचारी यांनी जावुन पाहणी केली तर ग्रामीण रुग्णालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र रसेडे, पो कॉ बिभीषण सांगळे यांनी पंचनामा केला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मयत विवाहीता यांचे आई वडील हे ऊसतोड कामगार असुन ते कर्नाटक येथे ऊसतोडीसाठी गेले आहेत.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post