खडसेंना दिलासा, याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी  ईडीने खडसेंविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली असून याचिकेवर 17 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.  मात्र खडसे यांचे वकील इतर कामात व्यस्त असल्याने त्यांनी कोर्टाकडे वेळ मागितला आहे. त्यामुळे खडसेंनी दाखल केलेल्या या याचिकेवर पुढील सुनावणी 17 फेब्रुवारीला होणार आहे.

 

मुंबई हायकोर्टात ही सुनावणी होईपर्यंत खडसे यांना सरंक्षण मिळणार आहे. यावर सुनावणी होईपर्यंत ईडीला त्यांच्याविरोधात काहीही कारवाई करता येणार नाही.

 

एकनाथ खडसे यांच्या विरोधात ईडीने ECIR दाखल केला आहे. खडसे यांच्या विरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. मंत्री असताना खडसेंनी कोट्यवधी रुपयांची जमीन लाटल्याचा त्यांच्यावर आरोप झाला होता. याबाबत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास पुणे एसीबीने केला होता. यानंतर तपास झाल्यावर याबाबत गुन्हा घडला असल्याचं आढळून येत नसल्याने एसीबीने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.

 

आता याच प्रकरणाचा ईडीने तपास सुरू केला आहे. याप्रकरणी ईडीने खडसे यांची चौकशीही केली. मात्र, त्यांना चौकशीसाठी पुन्हा यावं लागेल, अस सांगण्यात आलं होतं. यामुळे ईडी आपल्याला अटक करू शकते, असं खडसे यांना वाटल. यामुळे त्यांनी मुंबई हायकोर्टात आपल्या विरोधात ईडीने दाखल केलेला ECIR रद्द करावा या मागणीसाठी याचिका केली आहे. आज त्यावर सुनावणी झाली. ईडीतर्फे अडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तीवाद केला.

Leave A Reply

Your email address will not be published.