जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील संरक्षक भिंत तोडल्यानंतर व्यापार्यांनी बेमुदत बंद पुकारला असून पर्यायी संरक्षण व्यवस्था बाजार समितीने पुरवावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान आज दुपारी व्यापाऱ्यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या शिवाजी नगर येथील निवास्थानी जाऊन भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सुरेश जैन यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच बेकायदेशीरित्या काम होत असल्यास आपण व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन दिले. यावेळी आडत व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब बेहडे , शशिकांत बियाणी, सुनील तापडिया अशोक राठी, दीपक महाजन संजय शहा आदी उपस्थित होते .