उडीद,मूग पिकांच्या पंचनाम्याचे मिळाले आदेश

0

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्याचे शेतकऱ्यांचे कैवारी,माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी अमळनेर विधानसभा क्षेत्रामध्ये सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित पंचनामे करून तात्काळ मदत द्या यासाठी मागणी केली होती. शासनाने त्याची दखल घेऊन त्वरित पंचनामा पंचनामा करण्याचे आदेश दिले. शेतकरी बांधवांनी माजी आमदार पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

मागच्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या संसतधारेमुळे उडीद,मूग पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.याचीच दखल घेत माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला लवकरात लवकर उपाययोजना करण्याची विनंती केली होती.याचीच दखल घेत राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी प्रशासनाला पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.