लोकशाही न्यूज नेटवर्क
अहमदनगर , दि. ०९ –
अहमदनगरमध्ये महापालिकेसाठी अंदाजे ५५ टक्के मतदान झालं आहे. एकूण ६८ जागांसाठी हे मतदान झालं. त्यापैकी झी २४ तासने जनमताचा अंदाज घेतला. त्यानुसार अहमदनगरमध्ये देखील त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. येथे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात चुरशीची लढाई होती. त्यामुळे कोण सत्ता मिळवणार याबाबत अनेकांना उत्सूकता आहे. सगळ्याच पक्षाने निवडणुकीत जोर लावला होता.
कोणाला किती जागा ?
भाजप २० ते २७ जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर शिवसेना १५ ते २० जागा जिंकेल असा अंदाज आहे. काँग्रेस ४ ते ७ जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी १६ ते १८ जागा जिंकेल असा अंदाज आहे. अपक्ष, छोटे पक्ष मिळून साधारणतः ५ ते १० जागा जिंकतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे धुळ्यानंतर अहमदनगरमध्ये देखील त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.