अनिल देशमुखांवरील आरोपांची होणार सीबीआय चौकशी; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

0

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी सीबीआय कडून करण्यात येईल असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यावेळी न्यायालयाने १५ दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचं आदेशात म्हटलं आहे.

परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. जयश्री पाटील यांनी देखील अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. पोलिसांच्या नियुक्त्या, बदल्यांसाठी देशमुख पैशांची मागणी करतात, तपासकार्यात ते वारंवार हस्तक्षेप करतात, असे आरोप परमबीर यांनी याचिकेत केले आहेत.

मुंबई हायकोर्टानं अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.