अहमदपूर : गेल्या महिनाभरात लातूर जिल्ह्यातील अनूसूचीत जातींच्या मुलींवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार झाले असून यातून दोन मुलींना आपला जीव गमवावा लागला आहे.या अत्याचार ग्रस्तांना शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी अशी आग्रही मागणी सम्राट मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली एका शिष्टमंडळाने येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे आज एक निवेदन दिले असून या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पूढे म्हटले आहे की, शिरूरअनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील बौध्द कूटूंबातील मयत अश्वीनी सूर्यवंशी या मुलीचा एकतर्फी प्रेमातून खून झाला आहे.
तसेच तळणी मोहगांव ता.रेणापूर येथील बौध्द कूटूंबातील मयत कु.समिक्षा गायकवाड हिच्यावर सूध्दा एकतर्फी प्रेमातून प्रचंड त्रास देवुन आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे.दोन्ही घरातील मुली ह्या अत्याचारात मरण पावल्या आहेत.
त्यांचे कूटूंबीय भेदरलेले आहेत.त्याच प्रमाणे अहमदपूर तालुक्यातील मौजे धानोरा खूर्द येथील बौध्द समाजाच्या अल्पवयीन बालीकेवर गावातील युवकाने अत्याचार केला आहे.सदर मूलींच्या भावी आयुष्यासाठी आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता असून कूटूंबाचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे.शासनाने तातडीने या अत्याचार ग्रस्तांच्या कूटूबीयांना आर्थिक मदत देवून कूटूंबाचे पुनर्वसन करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर प्रशांत जाभाडे,पत्रकार अजय भालेराव,सचिन बानाटे,सूनिल कोमले,कमलाकर गायकवाड,परस कोमले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.