Breaking : चिनावल येथे २ लाखांचा हरबरा जळून खाक

0

चिनावल या.रावेर दि.(वार्ताहर) चिनावल शेती शिवारात आज दिनांक ५ रोजी रात्री ८ .३० वाजेच्या सुमारास वडगाव रस्त्यावरील मोहन प्रकाश नेमाडे यांचा सुमारे २ लाख रू किमतीचा हरबरा आगीत जळून खाक झाला.

मोहन नेमाडे यांनी त्याच्या शेतातील हरबरा कापून ढीग मळणी साठी लावून ठेवला होता मात्र आज रात्री ८ वाजेच्या सुमारास सदर ढीगास अचानक आग लागल्याने सदर शेतकऱ्यांचे सुमारे २ लाखापर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे .

दरम्यान सदर घटना कशी घडली या बाबत सर्वत्र तर्क वितर्क होत असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास ह्या मुळे हिरावला गेला आहे .सदर घटना कशी घडली या बाबत चौकशी होवून नुकसानी चां महसूल प्रशासनाने पंचनामा करावा व सदर शेतकऱ्यास शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी अशी जोरदार मागणी चिनावल परिसरातून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.