तिर्थ , धानोरा,येथिल शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा त्वरित सुरळीत करा

0

अहमदपूर/प्रतिनिधी

तालुक्यातील मौजे.तिर्थ व किन्नी कदु येथिल शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी गेल्या 7 मार्च रोजी आमरण उपोषणाची नोटीस दिली होती.त्यानुसार आज किनीकदू व तिर्थ येथील काही शेतकरी ठरल्याप्रमाणे उपोषण करण्यासाठी आले होते.सदरील शेतकऱ्यांची माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली असता सध्याची लाॕकडाऊनची परस्थीती लक्षात घेऊन माजी मंञी श्री विनायकराव पाटील यांनी अहमदपूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत कं. कार्यालयास भेट दििली

अधिकारी यांच्याशी चर्चा करून कार्यकारी अभियंता मठपती यांच्यासी दुरध्वनी वरुन संपर्क केला असता सदरील शेतकऱ्यांना येत्या विद्युत पुरवठा 10 ते 15 दिवसांच्या आत सुरळीत करून देऊ असे आश्वासन कार्यकारी अभियंता मठपती यांनी मंत्री श्री विनायकराव पाटील यांना दिल्यानंतर आजचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.

याप्रसंगी अमित रेड्डी , गोविंद गिरी हे उपस्थित होते.यावेळी किनीकदू व धानोरा येथील शेतकरी रामचंद्र पेड ,राजू पाटील, भगवान पाटील,माधव माने, संभाजी माने,बकरी भारती , मारोती पेड, गोविंद देवकाते,हणमंत पेड, संभाजी माने,धोंडीबा देवकते, गोविंद पेड, तुकाराम गंगथडे,यांच्यासह तीर्थ व किणी कदू येथील शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.