७२५ वर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा । माजीमंत्री गिरीश महाजनांच्या पाठपुराव्याला यश

0

जामनेर (प्रतिनिधी):- लुक्यातील सुमारे ७२७ वर शेतऱ्यांना त्यांच्या बँक खात्यासह अन्य तांत्रीक अडचणींमुळे कर्जमाफीपासुन वंचीत राहीले होते,तसा प्रस्ताव स्थानीक पातळीवरून मंत्रालयात पाठविण्यात आला होता,अखेर माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी संबंधीत सहकार मंत्रालय आणी विवीध शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करून त्या वरील सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती स्वतः गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांना दिली.

तालुक्यातीलबेटावद खुर्द, वाडी, मोयगांव, मांडवे, मोहाडी,सोनारी,भागदारा,वाकी, नांद्राहवेली, वाघारी आदी गावातील शेतकऱ्यांपैकी काहींची नावांत बदल, खातेक्रमांकात तफावत तर काहींच्या कर्जमाफीची रक्कम चुकीची दाखविण्यात येत होती अशा विवीध अडचणींमुळे तालुक्यातील ७२७ शेतकऱ्यांना कर्जमाफीपासुन वंचीत रहावे लागले होते.आता वरील सर्व त्रृट्या दुर करण्यात आल्याने कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाल्याचेही श्री महाजन यांनी सांगीतले.तसा सुधारणायुक्त प्रस्ताव जिल्हा बँकेसह प्रशासनाच्या संबंधीत विभागाकडे पाठविण्यात येऊन,त्यासाठीची कर्जमाफिची रक्कम सुध्दा बँकेकडे तात्काळ वर्ग करण्यात आल्यामुळे या सव्वासातशेवर शेतकऱ्यांना आता खऱ्या अर्थाने कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याने मनस्वी समाधान वाटत असल्याचेही माजीमंत्री महाजन यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.