सिद्धी महिला मंडळात अनेक सामाजिक संघटनांचा हातभार
चाळीसगाव :-पाणी फाउंडेशन च्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत ,चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव हे गाव देखील सहभागी झाले असून, रविवारी सकाळी रांजणगाव चे ग्रामस्थ आणि सिद्धी महिला मंडळासह, चाळीसगाव शहरातील अनेक सामाजिक संघटनांनी या श्रमदानात सहभाग नोंदवून पाणीबचत सोबतच परिसर सुजलाम सुफलाम करण्याचा संकल्प यावेळी घेतला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाणी संचलनाबरोबरच वृक्ष लागवडीचा ही संकल्प करण्यात आला .
या कार्यक्रमास सिद्धी महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर सौ उज्वला देवरे, आयकर आयुक्त उज्वल कुमार चव्हाण, माजी प्राचार्य बाळासाहेब चव्हाण ,आई फाऊंडेशनचे डॉक्टर विनोद कोतकर, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सौ सोनल साळुंखे, सारिका चव्हाण, पाणी फाऊंडेशनचे समन्वयक विजय कोळी, राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक धनंजय चव्हाण, पंचायत समितीच्या सदस्या सुनीता पाटील, सरपंच सोनाली निंबाळकर, जिजाऊ महिला समिती, हिरकणी महिला समितीच्या, ग्रीन मिशन फाउंडेशन, जनरल प्रॅक्टिशनर ,जलसागर ग्रुप, रोटरी मिलियन ,मेडिसिन डीलर ,यासह अनेक अनेक सामाजिक संस्थांनी या वेळी आपला सहभाग नोंदवला.