भडगांव शेतकरी संघाचा कारभार “अंधेर नगरी चौपट राजा ” सारखा चालू

0

शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी यांचा पत्रकार परिषदेत सवाल

भडगांव ( प्रतिनिधी) : भडगांव शेतकरी संघाचा “अंधेरी नगरी चौपट राजा “कारभार चालला असुन चेअरमनसह संचालक मंडळाचा रिंग मास्टर मुदत संपलेला मॕनेजर आहे कि काय ?अशी सर्व सामान्य शेतकऱ्यांची भावना झाली असून सदर अकार्यक्षम चेअरमनसह संचालक मंडळ बरखास्त करा अशी मागणी भडगांव येथील प्रगतीशील शेतकरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी यांनी आज त्यांच्या कार्यालयात आयोजित पञकार परिषदेत केली आहे.

या वेळी बोलतांना त्यांनी सांगितले कि,शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी त्यांच्या कल्याणासाठी  शेतकरी संघा सारख्या संस्थाची स्थापना केली परंतु या संस्था देशात अन राज्यात कशा चालत आहेत हे माहित नाहि परंतु भडगांव शेतकरी संघ ही संस्था शेतकऱ्यांच्या हिताची नसून ती व्यापारी वर्गाच्या कल्याणासाठी असल्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाहि.

नुकतीच शासनाकडून हमीभावानुसार ज्वारी,बाजरी,आणि मक्याची खरेदी सुरु झाली त्या करिता दि.१ डिसेंबर २० पासून वरील माल आसलेल्या शेतकऱ्यांच्या नांव नोंदणीची सुरु करण्यात आली त्या प्रमाणे १ डिसेंबर रोजीच शेतकऱ्यांनी ७/१२ उतारे आणि लागणारे कागदपञके दिलेत परंतु सगळ्यात आधी नंबर लागेल या आशेने चौकशी करण्यासाठी गेले आसता त्यांना तुमचा ७० वा नंबर आहे आसे सांगण्यात आले त्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि या बाबत संबधित चेअरमन आणि संचालकांना विचारले असता त्यांना या प्रकाराबाबत काहिच माहिती नसल्याचा बनाव त्यांच्या कडून करण्यात आला नंतर काही शेतकऱ्यांनी आमदार किशोर पाटील यांच्या कडे तक्रारी केल्या आमदार किशोर पाटील यांनी चौकशी चे आदेश दिले.

परंतु थातुर मातुर चौकशी करुन सदर शेतकी संघाच्या मॅनेजरला यांना हाताशी धरुन काहि व्यापाऱ्यांनी आपले कार्य साध्य करुन आपल्या गोडाऊन मधील  हजारो क्विंटल ज्वारी ,बाजरी,मका या शासकीय हमी भावात मोजत असल्याचे यावेळी सांगितले तसेच या बाबत चौकशी होऊन कारवाहि व्हावी मागणी आहे. नंतर गप बसून आपला नं आज लागेल उद्या लागेल या आशेने बाजरी, मका ज्वारी ट्र्क्टर मध्ये भरून वाट पहात बसलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला  कारण काल गुरुवार दि.१७ डिसेंबर पासून वरीलपातळीवरुन मका खरेदी बंद झाल्याचे कळले.

आता व्यापारी  १८५० चा मक्याला हमीभाव असतांना ११००,१२०० रु ने मागताहेत.ही सर्व साधारण शेतकरी वर्गाची पिळवणूक आहे .एकिकडे शासन शेतकऱ्यांना धिर देण्याचा प्रयत्न करत असतांना भडगांव शेतकरी संघाच्या चेअरमनसह संचालक मंडळाच्या  निष्क्रिय धोरणामुळे तालुक्यातील शेतकरी भरडला जात आहे.सदर शेतकरी संघातील कळीचा नारद आपल्या सेवेचा कालावधी संपलेला मॕनेजर देशमुख यांना तात्काळ कमी न केल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांसह आपण स्वतः आंदोलन करु असा ईशाराही परदेशी यांनी शेवटी त्यांनी दिला आहे

 

 

……

चौकट

 

सदर मॕनेजर अवधूत देशमुख यांचा  वयानुसार सेवा कार्यकाळ संपल्यानंतर देखील त्यांना ठराव करुन दि.१/४/२०ते ३०/४/२०२३ प्रर्यंत मुदतवाढ का? शेतकऱ्यांना वेठिस धरुन व्यापारी हित जोपासणार्या मॕनेजर वर संचालक मंडळाची एवढी मेहरबाणी का?यात संचालक मंडळाने संगनमताने काहि हात ओले केले तर नाहिना?बाहेर ईतके गरजु सुसंस्कृत उमेदवार त्या पदासाठि ईच्छुक असतांना रितसर जाहिरात देऊन नविन चांगला मॕनेजर न भरता या मॕनेजरवर संचालक मंडळाची मेहरनजर का.? असे एकना आनेक प्रश्न  परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.