इंदूर : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा सलामीवीर मयांक अग्रवालने पुन्हा एकदा झंझावाती खेळी करत द्विशतक ठोकलं. मयांकच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताने 350 धावांचा टप्पा ओलांडला आहे. कसोटीचा आजचा दुसरा दिवस आहे. मयांक अग्रवालने 303 चेंडूत द्विशतक ठोकलं. 196 धावांवर असताना मयांकने षटकार ठोकून द्विशतकाला गवसणी घातली. मयांकच्या द्विशतकानंतर भारताची धावसंख्या 4 बाद 365 इतकी होती.
There is no stopping this fella. @mayankcricket brings up his 2nd Double 💯 with a Maximum 🔥 pic.twitter.com/aI21CyAdYn
— BCCI (@BCCI) November 15, 2019
या कसोटीत टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच दिवशी अवघ्या 150 धावांत गुंडाळलं. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारताने जबरदस्त खेळी केली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या 6 धावांवर बाद झाल्यामुळे भारताची सुरुवात डळमळीत झाली. मात्र चेतेश्वर पुजारा आणि मयांक अग्रवाल यांनी खेळाची सूत्रं हाती घेऊन बांगलादेशी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी रचली. पुजारा 54 धावा करुन माघारी परतला.