पारोळा (प्रतिनिधी) : मागील चार पाच दिवसा पासुन उकाळ्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना आज सांयकाळी जोरदार पावसाने हजेरी लावत दिलासा दिला.
राज्यात मान्सुन दाखल होऊन चार पाच दिवस झाले तरीही पारोळा तालुक्यात कुढेच पावसाचे आगमन झाले न असल्याने शेतकर्यांसह व्यापारी हवाल दिल झाले होते,परंतु आज सांयकाळी शहरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काहीसा दिलासा मिळाला असुन सांयकाळी जवळ पास अर्धा ते एक तास जोरदार पाऊस झाला त्यां नंतर ही पावसाची रिपरिप सुरु होती या पावसाने शेतकर्यांचा शेतीच्या कामाला वेग येईल असे जाणकार मंडळी मध्ये चर्चा होती तर दुसरी कडे अनेक दिवसाच्या उकाळ्या पासुन काही तरी सुटका होईल असे ही म्हटले जात आहे,या पावसाने शहरातील संपुर्ण रस्ते जलमय झाले होते,तर या पावसाने शहरातील व्यापर्यां मध्ये ही उत्साहा दिसुन येत होता,