जळगाव । राज्यभर गाजलेल्या घरकुल घोटाळ्यातील शिक्षा सुनावलेल्या आरोपींनी जामीनासाठी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जामिनावर आज १८ सप्टेंबर रोजी कामकाज होणार आहे.
घरकुल घोटाळ्यातील आरोपींना धुळे जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आरोपींनी निकालाला स्थगिती मिळावी तसेच जामीन मिळावा यासाठी औरंगाबाद खंडपींठात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सोमवार दि. 16 रोजी न्यायमुर्ती तानाजी नलावडे याचेंसमोर कामकाज घेण्यात आले होते. यावेळी न्यायमुर्तीनी काही शंका उपस्थित केल्या. यावेळी पुरेश्या माहिती अभावी विशेष सरकारी वकील अॅड. अमोल सावंत यानां शंकाचे निरसन करता न आल्याने त्यांनी उत्तरे देण्यासाठी वेळ मागुन घेतल्यामुळे या प्रकरणात पुढील कामकाज 18 रोजी ठेवण्यात आले होते. आज या जामिनावर कामकाज होणार असून या सुनावणीकडे शहरासह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागुन आहे.