जळगाव (रजनीकांत पाटील):- नंदू भैय्या यांच्या पार्थिवावर अंतिम संस्करण हेतू बुऱ्हाणपूर येथे जाण्यापूर्वी जळगाव विमानतळ येथे पार्थिवाचे सोबत आलेल्या कृषी व शेतकरी मंत्री तथा ग्रामीण विकास व पंचायती राजमंत्री श्री नरेंद्र तोमर, सामाजिक न्याय अधिकारिता मंत्री श्री थावरचंद गहलोत, तसेच स्टील राज्यमंत्री श्री फगनसिंग कुलुस्ते आणि श्री ज्योतिरादित्य सिंधिया, खासदार ग्वालियर यांच्याकडे खासदार रक्षाताई खडसे याच्या नेतृत्त्वात स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत ग्रामीण व कृषी मंत्र्यांना अवगत करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या समक्ष कृषी मंत्र्यांकडे मांडल्या.
शेतकऱ्यांच्या समस्येबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन ग्रामीण व कृषी मंत्र्यांनी दिले. यावेळी सौ.उज्ज्वला पाटील, श्री.दीपक सूर्यवंशी, श्री.लालचंद पाटील, सौ.भारती सोनवणे, श्री राजेंद्र घुगे पाटील, श्री महेश जोशी, श्री.दीपक साखरे, श्री.राधेशाम चौधरी यांच्यासह स्थानिक शेतकरी उपस्थित होते.