एरंडोल तालुक्यात पावसाचे आगमन ; पिकांना मिळाले जीवदान

0

एरंडोल : तालुक्यात जवळपास तिन आठवड्यानंतर शनिवारी संकष्ट चतुर्थीच्या रात्री दमदार पावसाने हजेरी लावली.त्यामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी प्राप्त झाली.रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अर्धा ते पाऊन तास जोरदार पाऊस झाला.नंतर पहाटे दोन वाजेपर्यंत पावसाची रिमझिम सुरु होती.या पावसामुळे शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.शनिवारी रात्री पडलेल्या पावसाची मंडळ निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे उत्राण ६४,कासोदा ६०,एरंडोल ४४,रिंगणगाव १३ मी.मि.

जवळपास दोन आठवड्या पासुन वरुणराजा रुसुन बसला होता.शेवटी संकष्टीला गणरायाने पावसाचे विघ्न दूर केले.गेल्या पंधरा दिवसात रोज उन्हाळ्या चित्र जाणवत होते.इवल्या इवल्या खरीप पिकांची स्थिती अत्यंत नाजुक झाली होती.पावसा अभावी दुबार पेरणीचे संकट उंबरठ्या नजीक आले होते त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते.अखेर पावसाचे पुंरागमान झाल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदी झाला आहे.दरम्यान अंजनी धरण व पाझर तलाव भरण्यासाठी व शेत शिवारांमधून पाणी वाहुन निघेल यासाठी मुसळधार पाऊस व्हावा अशी अपेक्षा होत आहे.अजुनही अंजनी नदी व नालेखोल्यांना एकही पुर न आल्यामुळे ते प्रवाहित झाले नाहीत.तसेच अंजनी धरण तळ गाठलेल्या स्थितीत जैसे थे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.