आयोगाच्या परीक्षेत अपयश आल्याने तरुणाची आत्महत्या

0

पुणे :- राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्‍यातून राजगुरुनगर येथील युवकाने केदारेश्‍वर बंधाऱ्यात पाठीवरच्या सॅकमध्ये दगड ठेवून पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज (दि. 19) उघड झाली आहे.

रुपेश विष्णू बोऱ्हाडे (वय 28, रा. राजगुरुनगर, तिन्हेवाडी रोड, ता. खेड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे याबाबत खेड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजगुरुनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या केदारेश्‍वर बंधाऱ्यात आज (दि. 19) मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना नागरिकांनी दिली होती. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर नगरपरिषद कर्मचारी व नागरिकांच्या मदतीने पाण्यातील मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.