जळगाव- जागतिक सायकल दिना निमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सोमवार दि. ३ जून रोजी सामाजिक संदेश देणाऱ्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
संयुक्त राष्ट्र समितीने ३ जून हा जागतिक सायकल दिन घोषित केला आहे. आरोग्याच्या दृष्टीने व प्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने ही घोषणा करण्यात आली आहे. विद्यापीठात सोमवारी मुख्य प्रवेशद्वारापासून प्रशासकीय इमारतीपर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी व संभाजीनगरच्या एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विलास सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी रा.से.यो. संचालक डॉ. सचीन नांद्रे उपस्थित होते. या रॅलीत प्रा. किशोर पवार , प्रा. दिपक दलाल, प्रा.मनोज पाटील, प्रा.प्रतिभा गलवाडे, चंद्रकांत महाजन, तेजस वाणी, आदर्श पाटील, इरफान पिंजारी, महेश वाणी, राजू मराठे, सुभाष पवार, राम घोरपडे, समीर रोकडे यांनी सहभाग घेतला. रा.से.यो. समन्वयक डॉ. दिनेश पाटील, डॉ. मनोज इंगोले, अरूण सपकाळे, शिवाजी पाटील, कैलास औटी, आकाश भामरे, विजय बिऱ्हाडे, वैभव बाविस्कर, दर्शन नेवे, संकेत चौधरी, वैशाली कोळी आदी उपस्थित होते.