रामदास आठवले यांनी मयत रामा कातकरी यांच्या पत्नीची भेट घेऊन सांत्वन केले

0

पेण प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रायगड जिल्ह्यातील पेण येथील विनोबा भावे यांचे स्मारक असलेल्या गागोदे बुद्रुक या गावातील चक्रीवादामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला व पाहणी केली.

यावेळी चक्रीवादामुळे मयत झालेल्या रामा बाबू कातकरी या इसमाच्या पत्नीची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. “कोकणात वादळीवाऱ्यासह पाऊसही झाला. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडलीत. तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे आणि छप्परही उडाले.चक्रीवादळामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला तर शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

पेण तालुक्यातील 1000 घरांचे पंचनामे सुरू असून लवकरच त्यांना सरकारने नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. “असे रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.

यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष रीपाई (आठवले गट) जगदीश गायकवाड, पेण तहसीलदार अरुणा जाधव,प्रशासकीय अधिकारी इत्यादी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.