नगरसेवकासह चौघांची हत्या ; भुसावळात प्रचंड तणावाचे वातावरण,सर्वत्र तगडा बंदोबस्त

0

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील भाजपचे नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या खरात यांच्यासह त्यांची दोन्ही मुले व मोठ्या बंधूंसह अन्य एकावर अज्ञात आरोपींनी गोळीबार तसेच चाकूने हल्ला करून खून केल्याची काल रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास घडली.  दरम्यान, शहरात प्रचंड तणावाचे वातावरण असून सर्वत्र तगडा बंदोबस्त लावलेला आहे. आज दुपारी सर्व मयतांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार होणार असल्याचे कळते.

रविवारी रात्री हल्लेखोरांनी रवींद्र बाबूराव खरात यांच्या कुटुंबावर हल्ला चढविण्यात आला. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी पहिल्यांदा सुनील बाबूराव खरात यांच्यावर गोळीबार करून गुप्तीने वार केले. हा आवाज ऐकून रवींद्र खरात आणि त्यांचे कुटुंबिय घराबाहेर आले असतांना हल्लेखोरांनी त्यांच्याकडे मोर्चा वळविला. यात रवींद्र खरात यांच्यावर घराजवळ गोळीबार करण्यात आला. तर त्यांची मुले जीव वाचवण्यासाठी पळाली असतांना आरोपींनी त्यांचा पाठलाग करत रेल्वे हॉस्पीटलजवळ त्यांनाही ठार मारले. मृतांमध्ये  नगरसेवक रवींद्र खरात, त्यांचा मुलगा रोहित उर्फ सोनू, मुलगा प्रेमसागर तसेच मोठे बंधू सुनील बाबूराव खरात (48) व अन्य एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या हल्ल्यात नगरसेवक खरात यांच्या पत्नी रजनी खरात व मुलगा हंसराज देखील जखमी झाला आहे. दरम्यान खुनाच्या घटनेनंतर अवघ्या तासाभरात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीवरून तिघाही आरोपींच्या मुसक्या आवळल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे. संभाव्य हाणामारीच्या भीतीने अनेक पालकांनी आज मुलांना शाळेत पाठवलेले नाही. तर पोलिसांनी शहराला जणू छावणीचे स्वरूप दिले आहे. सर्व मयतांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार होणार असल्याचे कळते.

Leave A Reply

Your email address will not be published.