गिरणा धरणातून 1200 क्युसेसने पाण्याचा विसर्ग

0

भडगाव : गिरणा धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरणाचा एक दरवाजा आज साडे अकरा वाजेच्या सुमारास उघडण्यात आला आहे. धरणातून 1 हजार 200 क्युसेसने पाणी सोडण्यात आल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाकडुन सांगण्यात आले. पाणलोट क्षेत्रातील धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यास अजुन पाण्याचा विसर्ग वाढू शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावकर्यानी सतर्कता बाळगावी असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाकडुन करण्यात आले आहे.

गिरणा धरण काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शंभर टक्के भरले. मात्र पाणलोट क्षेत्रातील धरणातून पाण्याचा विसर्ग कमी असल्याने काल पाणी सोडण्यात आले नव्हते. मात्र सकाळी पाण्याची आवक वाढल्याने धरणाचा एक दरवाज्यातून 1 हजार 200 क्युसेसने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

धरणातून पाणी सोडल्याने गिरणा नदीला पुर येणार आहे. त्यामुळे नदी किनारी गावाकऱयांनी तसेच नागरिकांनी कोणी ही नदीत जावू नये असा इशारा आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाकडून दिला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.