Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    गुन्हे वार्ता

    शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या

    महिलेनेच केले चाकूने सपासप वार : दोन महिला अटकेत
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 20, 2026No Comments610 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    शिर्डीच्या साई मंदिराच्या गेटसमोर भयंकर हत्याकांडाची घटना घडली. साईबाब मंदिर परिसरात स्टिकर आणि फळे विकणाऱ्या महिलांच्या एका गटानेदुसऱ्या एका फळ विक्रेत्या महिलेवर चाकूने वार करत तिची हत्या केली. रविवारी रात्री ही हत्येची घटना घडली. साई मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ समोर भर गर्दीत महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जयश्री साईनाथ क्षीरसागर (३० वर्षे) या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी २ फळ विक्रेत्या महिलांना शिर्डी पोलिसांनी अटक केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, साई मंदिर परिसरात वर्दळीच्या ठिकाणी चार ते पाच महिलांनीच दुसऱ्या महिलेवर धारदार चाकूने वार करून हत्या केली. या घटनेमुळे मंदिर परिसरात गोंधळाचे वातावरण होते. फळे विकण्यासाठी उभं राहण्याच्या किरकोळ कारणाहून झालेला वाद थेट चाकू हल्ल्यापर्यंत पोहचल्याची प्राथमिक माहिती आहे. भररस्त्यात आरोपी महिलांनी जयश्री यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

    या प्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजली खांडीझोड (२२ वर्षे) आणि फिजा पटेल (२१ वर्षे) या दोन महिला आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिर्डीत आता तरुणांच्या टोळक्यांसह महिलांचा गुंडराज सुरू झालाय का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या हल्ल्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र गुंड प्रवृत्तीच्या काही महिला हातविक्रेत्यांमुळे साई भक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला असल्याची चर्चा होत आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करत दोन महिलांना ताब्यात घेतलं. पोलिस सध्या तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif