Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आयटी कंपनीतील हिंदू मुलींचे धर्मांतर करून मानसिक छळ!
    • रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!
    • जिल्ह्यासाठी पुढील आठवडा ठरणार तापदायक!
    • नवनियुक्त सीर्इओ करिश्मा नायरांनी पदभार स्वीकारला
    • तोल जावुन पडल्याने प्लबींग कारागिराचा मृत्यू
    • जळगाव सराफ बाजारात सोन्या-चांदीची चकाकी वाढली
    • शूद्रातिशूद्रांना हक्काची जाणीव करुन देणारे : ‘क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले’!
    • हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांचा राजीनामा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»पाडुरंगा महाराष्ट्रात काय दिवस बघायला मिळताहेत!
    महाराष्ट्र

    पाडुरंगा महाराष्ट्रात काय दिवस बघायला मिळताहेत!

    हात जोडून असे का म्हणल्या सुप्रिया सुळे?
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 24, 2026No Comments184 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    साताऱ्यातील प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. पालकमंत्री शंभुराज देसाई यांना भाजपाच्या मंत्र्यांकडून थेट रस्त्यावर मारहाण करण्यात आली. काल शिवसेना शिंदे गटाचे आमदार यादरम्यान आक्रमक झाले आणि त्यांनी थेट विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. याबद्दल आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले. सुप्रिया सुळे यांनी शंभुराज देसाई यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला. शंभुराज देसाई काल विधीमंडळात जे बोलले ते धक्कादायक होते, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले. पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, एका कॅबिनेट मंत्र्याला मारहाण कशी होते? या घटनेचा निषेधच आहे. कोणाच्याही मनमर्जीने हा देश चालणार नाही. हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच चालणार. हा पोलिसांचा संबंध नाही. त्याठिकाणी असलेल्या पोलिसांच्या मागे जी शक्ती होती ती त्या अदूश्यशक्तीचा ताकद आहे. हे पोलिसांना करायला लावले नाही तर महाराष्ट्रातील पोलिस असे करणारच नाहीत, असा माझा विश्वास आहे.

    पुढे सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, मी मुख्यमंत्र्यांना याबद्दलचे पत्र लिहिणार आहे. काल मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत याबाबत चर्चा केली. कारण दिल्लीतील वर्मतमान पत्रांमध्ये काही बातम्या आल्या आहेत. पण महाराष्ट्रासाठी हे दुर्देव आहे, जी काही साताऱ्याच घटना झाली. लोकशाहीची हत्या आहे. हा मोठा भाऊ आणि छोटा भाऊ असा विषयच नाहीये.

    ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत अशी गुंडागर्दी होणार असेल तर त्याच्यापुढे ताकदीने लढण्याची गरज आहे. आज हा साताऱ्याचा विषय आहे. उद्या परत 10 ठिकाणी होईल, मुळात म्हणजे असे करणेच चुकीचे आहे. मी शंभूराजेंनाही फोन करणार आहे आणि मी मकरंद पाटलांना फोन करून अगोदरच सर्व माहिती घेतली आहे.

    पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, शंभुराज देसाई आणि मकरंद पाटलांना धक्काबुक्की झाली असेल तर याची चाैकशी व्हायला पाहिजे, दोघेही कॅबिनेट मंत्री आहेत. म्हणजे ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात तेच सरकार तुम्हाला धक्काबुक्की करतंय. पाडुरंगा काय दिवस बघायला मिळत आहेत, महाराष्ट्रामध्ये. तेही मित्र पक्षांनाच ते त्यांचे मित्र पक्षच आहेत ना? असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!

    April 10, 2026

    जिल्ह्यासाठी पुढील आठवडा ठरणार तापदायक!

    April 10, 2026

    नवनियुक्त सीर्इओ करिश्मा नायरांनी पदभार स्वीकारला

    April 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.