Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली
    महाराष्ट्र

    विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 25, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यात रोज तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अख्खं राज्य हादरून गेलं आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आज विधानसभेतही शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावर चर्चा झाली. यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. मात्र, ही भूमिका मांडत असताना त्यांची जीभ घसरली. तोंडातून नको तो शब्द बाहेर आला. त्यामुळे सर्वच आवाक् झाले.

    राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली. काय भीकारचोटपणा सुरू केला आहे. एकीकडे लोक आत्महत्या करतात तर दुसरीकडे 5 ट्रिलियन संदर्भात बोललं जात आहे. 14 जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात 21 हजार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील फक्त 10 हजार शेतकऱ्यांना शासनाने मदत केली आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

    महापुरुषांच्या आदेशाचं या राज्यात कुठे पालन केलं जातंय? छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला जातो आणि अवघ्या 7 महिन्यात पुतळा कोसळतो. पदोपदी शिवाजी महाराजांचा अपमान केला जातोय. या राज्यात सर्वांना घेऊन जायची भूमिका असली पाहिजे. पण दोन समाजात भांडणं लावून राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं काय झालं? मागील राज्यपालांच भाषण आणि आताच भाषण हे एकच असल्याचं पाहायला मिळतंय. आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त करतोय, असं वडेट्टीवार म्हणाले.

    दरम्यान, राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. राज्यात दररोज सरासरी 3 शेतकरी आत्महत्या करत असल्याची माहिती विधानसभेच्या प्रश्नोत्तरांमध्ये आली आहे. 2009 ते 2025 या कालावधीत एकूण 2783 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. 2025 या वर्षातच सर्वाधिक 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. सर्वाधिक आत्महत्या पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात झाल्याचं दिसून आलं आहे. या दोन विभागात आत्महत्येची तब्बल 1987 प्रकरणे समोर आली आहेत.

    #maharashtra assembly Budget session Farmer suicide Governor's Address Vijay Vadettiwar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

    March 10, 2026

    फरार फौजदारासह पुत्राला अटक

    March 10, 2026

    इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.