वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
वरणगाव तालुक्यातील सावतर – निंभोरा येथे पत्री खुराड्यात विजेचा प्रवाह उतरल्याने बांधलेल्या चार शेळ्या दगावल्याने पशुधन मालकाचे साठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना पहाटे पाच वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत वृत असे की, तालुक्यातील सावतर – निंभोरा येथिल रहिवाशी व पशुधन मालक भागवत विष्णू कोळी यांच्या घराजवळील विजेच्या खांबा वरून येणारी केबल मध्ये अचानक शार्ट सर्किट झाल्याने पत्री शेड मध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने शेळी खुराड्यात बांधलेल्या शेळ्या पैकी चार शेळ्यांना विजेचा स्पर्श लागल्याने जागीच दगावल्याने शेळी पालन मालकचे सुमारे साठ हजार रुपायाचे नुकसान झाले. हि घटना शेळ्या मालकाच्या सकाळच्या सुमारास लक्षात आली. खुराड्यात दहा ते पंधरा शेळ्या बांधलेल्या होत्या. सदर घटनेचा पंचनामा करून शासन स्तरावरून मदतीची अपेक्षा पशुधन मालक भागवत कोळी यांनी केली आहे.