लोकशाही, न्यूज नेटवर्क
राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) व गारपिटीने थैमान घातले आहे. आणि त्याचमुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्याचं उभं राहिलेलं पीक वाहून गेलं आहे. त्यामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. अवकाळीचं हे संकट कधी दूर होईल याची वाट शेतकरी पाहत असताना, दुसरीकडे एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. देशात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहणार असल्याचा अंदाज सोमवारी स्कायमेटनं वर्तवला होता. मात्र, आता हवामान तज्ज्ञांनी एक चिंता व्यक्त केली आहे.
राज्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हीच स्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास पर्जन्यमानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.मे महिना सुरू झाल तरी राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे. अनेक भागात झालेल्या गारपीटीने बळीराजा त्रस्त झाला आहे. अवकाळीचं हे संकट कधी दूर होईल याची वाट शेतकरी पाहत मान्सून लांबणीवर पडू शकतो. अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे याचा फटका मान्सूनवरही होऊ शकतो. अशी भीती सुद्धा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.