उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार ?
भुजबळांना अजितदादांच्या बैठकीत करमत.. , संजय शिरसाटांचे मोठे भाष्य
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर हे दोघे एकत्र येण्याची चर्चा रंगली. यावर मंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य केले.
राजकारणात काही घडतही नाही आणि बिघडत नाही. उबाठा गटाच्या काही लोकांमध्ये उतावळेपणा आलेला आहे. त्यांना वाटतंय आपण आता कुठे तरी उडी मारली पाहिजे. म्हणून ते प्रयत्न करत आहेत. मग त्यांना देवेंद्रजी चांगलं काम करत असल्याचं आठवतं. सकाळी मोदीजी चांगलं काम करत असल्याचं सांगतात. संध्याकाळी वाटतं नाही करत. त्यांना फ्रस्टेशन आलेलं आहे. त्याचाच एक भाग आहे. कुठे जायचं हे गोंधळात ते आहेत. त्यांना कोणी स्वीकारायला तयार नाही हा महत्त्वाचा मुद्दा, असा टोला त्यांनी लगावला आहे.
तसेच कालच फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की रिलेशन असणं वेगळं आणि राजकारण असणं वेगळं. त्यांची आमच्यासोबत युती होणं शक्य नाही असं फडणवीस म्हणाले, याची त्यांनी आठवण करुन दिली. काहीच होणार नाही. भाजप आणि शिवसेना एकत्र येणारच नाही. जे उठसूट रोज मोदींबद्दल अमित शाहांबद्दल घाण विधान करतात त्यांना भाजप कधीच स्वीकारणार नाही. हे तुम्हाला लिहून देतो, असे त्यांनी छातीठोकपणे सांगितले. तर शिंदे गट आणि ठाकरे गट सुद्धा एकत्र येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांची काही गरजच नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत जाणार नाही. काही चान्स नाही, असे शिरसाट म्हणाले.
भुजबळांना फडणवीस जवळचे वाटत असतील. म्हणून वारंवार बैठका होतात. वारंवार जातात. पण अजितदादांच्या बैठकीत त्यांना करमत नसावं म्हणून ते बैठकीला गेले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.