Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    राजकारण

    उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!

    शेतकरी नेत्याचा आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 17, 2026No Comments312 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    शिवसेनेत फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात राजकीय शत्रुत्व निर्माण झालं आहे. दोन्ही नेते राजकीय मंचावरून एकमेकांवर बेछूट आरोप करताना दिसतात. विधानसभा निवडणुकीतही दोन्ही गटाने एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले होते. मात्र, शिवसेनेत फूट पडली असली तरी उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात, असा खळबळजनक आरोप शेतकरी नेत्याने केला आहे. शेतकरी नेत्याच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर हे वाशिम दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान रविकांत तुपकर यांनी राज्यातील राजकीय घडामोडी, शेतकऱ्यांच्या मुद्यावर भाष्य केलं. यावेळी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर महत्वाचं विधान केलं.

    ‘वेगवेगळ्या पक्षाचे आमदार मुंबईत एका ताटात काला करून खातात. मी जवळून पाहिले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे किती भांडतात, पण दिल्लीत एका ताटात खातात, असा खळबळजनक आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी वाशिम येथून केलाय. वाशिम येथे उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं.

    वाशिमच्या आडोळी येथे शेतकऱ्यांची विना अट सरसकट कर्जमाफी करावी या मागणीला घेऊन गावातील शेतकऱ्यांनी ‘गाव विक्रीला काढलं होतं आणि ठिय्या आंदोलनही सुरू केलं होतं. ठिय्या आंदोलन सलग ११ दिवस चालल्यानंतरही प्रशासनानं याची दाखल न घेतल्याने शेतकरी सतीश इढोळे यांनी ११ एप्रिल रोजीपासून आमरण उपोषण सुरु केलं होतं. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज शुक्रवारी आंदोलनाला भेट देऊन आमरण उपोषण सोडवलं. त्यानंतर त्यांनी भाषणादरम्यान खळबळजनक आरोप केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif