ज्यांना शरद पवारांनी राजकारणात आणले, तेच आता…

सुनील तटकरेंच्या पवारांना मार्गदर्शना बद्दल आश्चर्य

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

अजित पवारांच्या दुःखद निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. सुनील तटकरेंनी शरद पवारांना मार्गदर्शन केल्याबद्दल संजय राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केले. ज्यांना शरद पवारांनी राजकारणात आणले, तेच आता त्यांना सल्ले देत आहेत, असे राऊत म्हणाले.

विलीनीकरणाबाबत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून वेगवेगळी विधाने येत आहेत. एका गटाने चर्चा झाल्याचे सांगितले, तर दुसऱ्याने ती फेटाळली. अलीकडेच शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात पाऊण तास चर्चा झाली. शरद पवारांनी स्पष्ट केले की, विलीनीकरणाची चर्चा अजित पवारांशी सुरू होती, मुख्यमंत्री त्यात नव्हते. त्यांना तसा अधिकार नव्हता, असेही राऊत यांनी सांगितले.

शरद पवार आणि त्यांचा पक्ष सध्या इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडीचे सदस्य आहेत. विलीनीकरणाचा निर्णय घेतल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात, परंतु त्याला अजून वेळ आहे. प्रफुल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांच्यासारखे नेते आता शरद पवारांना आणि त्यांच्या पक्षाला सोबत घेण्यास इच्छुक दिसत नाहीत, कारण अमित शाह आणि मोदी यांची तशी इच्छा नसावी, असे राऊत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.