जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
शहरात सध्या चोरीचे प्रमाण कमालीचे वाढत आहेत. असेच एक प्रकरण शहरातील विवेकानंद नगरात उघडकीस आले आहे. तब्बल १ लाख ६२ हजाराचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कमेची चोरी झाल्याची घटना दि २५ रोजी घडल्याचे वृत्त आहे. याबाबत रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, विवेकानंद नगरातील रहिवासी निलेश शेखर वारके (४०) हे त्यांच्या परिवारासह वास्तव्यास आहेत. दि २२ रोजीच्या सायंकाळी पासून ते २५ च्या सकाळपर्यंत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात दरवाजाचा कडी कोयडा तोडून घरात प्रवेश करत घरातील सोने-चांदीचे दागिने व रोक रक्कम चोरून नेल्याची तक्रार वारके यांनी रामानंद पोलिसात केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोउनि.गोपाल देशमुख हे करीत आहेत.