Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»झालेली चूक दुरुस्त करावी.. अजूनही वेळ गेली नाही…
    राजकारण

    झालेली चूक दुरुस्त करावी.. अजूनही वेळ गेली नाही…

    तुम्ही संपून जाल आणि तुमच्या पक्षाची वाट लागू शकते!
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 10, 2026No Comments40 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठीचे दिलेले आदेश मागे घ्यावेत. झालेली चूक दुरुस्त करावी. अजूनही वेळ गेली नाही. मी मुख्यमंत्र्यांना पुन्हा आवाहन करतो. आपल्या मंत्र्याची चूक मान्य करा. नाही तर मी यापेक्षाही मोठं आंदोलन करेल, असा इशाराच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील हे सांगलीत आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी हा इशारा दिला.

    मनोज जरांगे पाटील हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राज्यभरात मराठा समाजाशी संवाद साधत असून त्यांना आंदोलनाची रणनीती सांगत आहेत. येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे निर्णायक आंदोलन छेडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे दौरे सुरू आहेत. आज सांगलीत आले असताना त्यांनी पुन्हा एकदा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात जोरदार हल्लाबोल केला.

    नोंदणी अवैद्य करा म्हणून त्यांनी बावनकुळेंनी सांगितलं. त्यांची पत्रावर सांकेतिक भाषा आहे. मला मंत्र्यांच्या ओएसडी आणि पीएसने सांगितलं. अ लिहिलं म्हणजे या मागणीला प्रथम प्राधान्य द्यायचं, असा त्याचा अर्थ आहे. तसेच अधिकाऱ्याने काय कारवाई केली त्याचा प्रस्ताव पाठवायचा असतो. तुम्ही हस्तक्षेप करत नाही तर मग प्रस्ताव का मागितला? त्वरीत प्रस्ताव का मागवला? अवैध करून प्रस्ताव मागितला आहे. तुम्ही कितीही स्पष्टीकरण द्या. तुम्ही चुकले आहात. तुम्ही संपून जाल आणि तुमच्या पक्षाची वाट लागू शकते. मुख्यमंत्र्यांनी अजूनही आमच्या मंत्र्याने चूक झाल्याचं सांगून चूक दुरुस्ती करावी. वेळ गेली नाही, असं जरांगे म्हणाले. त्यांनी चूक दुरुस्त करू नये. मराठ्यांचं वाटोळं करावं, मग त्यांना कळेल. मी खूप ताकदीचं आंदोलन करणार आहे. सुट्टीच नाही. त्यामुळे चूक दुरुस्त करा, असा इशाराही त्यांनी दिला.

    सरकार जातपडताळणी समितीत हस्तक्षेप करत नाही. सरकारला अधिकार नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने काम करत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे मीडियासमोर म्हणाले होते. मग बावनकुळेंना कोर्टाने इंडोसमेंट करण्याचे अधिकार दिले आहे का? किती वेड्यात काढणार आहात? हा सरकारचा हस्तक्षेप नाही का? मग बावकुळेंचं पत्र काय आहे? हस्तक्षेप नाही का? असे सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित करा.

    बावनकुळेंना काही अक्कल आहे का?

    मराठा समाज पेटून उठला आहे. ही परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ नये. मराठा समाजावर अन्याय होऊ नये. ही इच्छा आहे. मंत्रिपदाचा गैरवापर करून जाणूनबुजून हेच केलं आहे. बावनकुळेंनी मराठा समाजावर अन्याय केला आहे. सरकार नवीन नवीन डाव शोधत आहे. मराठा समाजाच्या नोंदी रद्द केल्या जात आहे. काही तरी खोटं बोलत आहे. नोदींतील क्षुल्लक चुका दाखवल्या जात आहे. कुठे कुणबा लिहिलंय, कुठे पेनाने लिहिलंय, कुठे शाईने लिहिलंय, तर कुठे हस्ताक्षरात बदल आहे, असे बहाणे दिले जात आहे. गावात आलेले तलाठी बदलले की नाही? दर वर्षी तलाठी बदलतो. अक्षर बदलतात. एकच तलाठी 50-50 वर्ष एकाच गावात राहतो का? बावनकुळे काही तर बहाणे करत आहेत. बावनकुळेंना काही अक्कल आहे का? मला कळत नाही, असा हल्लाच त्यांनी चढवला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif