Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»आरोग्य»अतिसूक्ष्म धूलिकणांमुळे जळगावकरांचा जीव धोक्यात!
    आरोग्य

    अतिसूक्ष्म धूलिकणांमुळे जळगावकरांचा जीव धोक्यात!

    धक्कादायक : आय क्यू एअर स्विसच्या हवा गुणवत्ता अहवालात चिंता
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 28, 2026Updated:March 30, 2026No Comments153 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही विशेष
    दीपक कुलकर्णी

    जळगाव

    दिवसेंदिवस प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत असून जळगावकरांसाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालात जळगावकरांना अतिसूक्ष्म धूलिकणांचा धोका वाढला असून यावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

    आय क्यू एअर या स्विस कंपनीने सादर केलेल्या सन 2025 च्या जागतिक हवा गुणवत्ता अहवालामध्ये जळगावचे नाव अग्रक्रमावर आले आहे. महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव आणि बेलापूरसारख्या शहरातील पीएम 2.5 (अतिसूक्ष्म धूलिकण)चे प्रमाण धोकादायक असल्याचे हा अहवाल सांगतो. पर्यावरण आणि आरोग्यासाठी सर्वाधिक घातक असलेल्या अतिसूक्ष्म धूलिकणांचा (पीएम 2.5) जळगावात प्रसार वाढता आहे. शहरासह जिल्हाभरात प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्यावर उपाययोजना मात्र शून्य असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरासह ग्रामीण भागात विविध प्र्रकारच्या प्रदूषणाचा विळखा पडत असतांनाही प्रशासकीय पातळीवर यावर उपाययोजना शून्य होतांना दिसत आहे. कचरा, अतिसूक्ष्म धूलिकण, रस्त्याच्या कडवर असलेल्या विट भट्ट्या, वाळूचा उपसा हे प्रदूषण वाढवित असतांनाही त्यावर कठोर कारवार्इ होतांना दिसत नाही.

    वाढत्या वायुप्रदूषणामुळे जळगावकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम 2.5) चे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब ठरत असून, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आय क्यू एअर या स्विस संस्थेच्या 2025 च्या जागतिक हवा गुणवत्ता अहवालात जळगावचे नाव धोकादायक शहरांमध्ये समोर आले आहे. या अहवालामुळे प्रशासनासह नागरिकांमध्येही खळबळ उडाली आहे.

    अहवालानुसार, जळगाव शहरात पीएम 2.5 या अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. हे धूलिकण इतके सूक्ष्म असतात की ते थेट फुफ्फुसात प्रवेश करतात आणि रक्तप्रवाहात मिसळून विविध गंभीर आजारांना कारणीभूत ठरतात. जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या सुरक्षित मर्यादेपेक्षा जळगावातील प्रदूषणाची पातळी खूपच जास्त असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
    महाराष्ट्रातील इतर काही शहरांसह जळगाव, मालेगाव आणि बेलापूर येथेही परिस्थिती चिंताजनक असल्याचे दिसून आले आहे. औद्योगिक वाढ, वाहनांची वाढती संख्या, रस्त्यांची खराब स्थिती आणि अनियंत्रित बांधकाम यामुळे हवेत धूलिकणांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे शहरातील हवा अधिकच प्रदूषित होत चालली आहे.

    जळगाव शहरासह ग्रामीण भागातही प्रदूषणाचा विळखा घट्ट होत चालला आहे. रस्त्यांच्या कडेला असलेल्या विटभट्ट्या, बांधकामातून उडणारी धूळ, कचऱ्याचे खुले जाळणे, वाळू उपशामुळे निर्माण होणारी धूळ यामुळे वातावरणात प्रदूषण वाढत आहे. मात्र या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहेे. प्रदूषण नियंत्रणासाठी नियम असले तरी त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून त्यावर कठोर कारवाईचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

    पीएम 2.5 चे प्रमाण वाढल्याने दमा, हृदयविकार, फुफ्फुसांचे आजार, तसेच कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीच आजारांनी त्रस्त असलेले रुग्ण यांना याचा सर्वाधिक फटका बसतो. दीर्घकाळ अशा प्रदूषित हवेत राहिल्यास आयुष्याची गुणवत्ता घसरते आणि आयुर्मानही कमी होऊ शकते. जळगावमध्ये वाढत्या प्रदूषणामुळे सकाळी आणि सायंकाळी हवेत धुरकटपणा जाणवतो. काही भागात दृश्यमानता कमी होत असल्याची तक्रार आहे. अनेकांना डोळ्यांची जळजळ, घशात खवखव, श्वास घेण्यास त्रास अशा समस्या जाणवू लागल्या आहेत. या समस्या भविष्यात आणखी गंभीर स्वरूप धारण करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरात हरितक्षेत्र वाढवणे, धूळ नियंत्रणासाठी पाणी फवारणी, बांधकाम नियमांची काटेकोर अंमलबजावणी, कचरा व्यवस्थापन सुधारणा, तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे यासारख्या उपाययोजना तातडीने राबवण्याची गरज आहे.

    प्रशासनाची अनास्था!
    अनावश्यक वाहनांचा वापर टाळणे, कचरा न जाळणे, वृक्षारोपण करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे यामुळे प्रदूषण कमी करण्यास मदत होऊ शकते. प्रशासन आणि नागरिक यांचे संयुक्त प्रयत्नच या समस्येवर दीर्घकालीन उपाय ठरू शकतात. जळगावमधील वाढते वायुप्रदूषण ही केवळ पर्यावरणाची नव्हे तर सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे. अहवालाने या संकटाची तीव्रता अधोरेखित केली असून आता तरी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

    April 17, 2026

    माणसाने झेपेल तितकेच बोलावे!

    April 17, 2026

    किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.