Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»‘खरात’ प्रकरणावरून पुन्हा एकदा उडाली खळबळ
    महाराष्ट्र

    ‘खरात’ प्रकरणावरून पुन्हा एकदा उडाली खळबळ

    चक्क ‘चार मंत्र्यांचा समावेश’ असल्याचा केला आरोप
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 10, 2026No Comments677 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    महाराष्ट्राच्या राजकारणात ‘खरात’ प्रकरणावरून पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामध्ये राज्य मंत्रिमंडळातील तब्बल चार मंत्र्यांचा थेट समावेश असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या मंत्र्यांची नावे पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळवणार असून, त्यांना तातडीने मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी करणार असल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केले.

    नाना पटोले यांनी या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित करताना सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. “आम्ही यापूर्वीही विधानसभेत या विषयावर आवाज उठवला होता. खरातकडून सर्व माहिती काढून घेतली जात आहे, पण भीती अशी आहे की, ज्याप्रमाणे अक्षय शिंदेला मारले गेले, तसेच याचेही केले जाईल. या संपूर्ण प्रकरणात चार मंत्र्यांचे हात गुंतलेले आहेत आणि त्याची वस्तुस्थिती लवकरच समोर येईल,” असे पटोले म्हणाले.

    या प्रकरणातील पुराव्यांबाबत बोलताना पटोले यांनी सांगितले की, “या चारही मंत्र्यांच्या सहभागाबाबतची सविस्तर पत्रे आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. ज्या मंत्र्यांची नावे या प्रकरणात येत आहेत. त्यामुळे या चारही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, ही आमची प्रमुख मागणी आहे.”

    खरात प्रकरणात कोणत्या बड्या नेत्यांची नावे आहेत, याबाबत अद्याप अधिकृत तपशील समोर आलेला नसला तरी, नाना पटोले यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif