Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»सरकार गरिबांची थट्टा करतंय : रोहित पवार भडकले
    राजकारण

    सरकार गरिबांची थट्टा करतंय : रोहित पवार भडकले

    सरकार निर्लज्ज झालं आहे, यांना गरीबांचं पडलं नाही
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 3, 2026No Comments174 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मुंबईत एकीकडे पावसाचा कहर सुरू आहे. दुसरीकडे दुर्घटनाही मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर साकिनाक्यात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या सर्व दुर्घटनेवरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकावर संताप व्यक्त केला आहे. सरकार गरिबाची थट्ट करतंय, असं म्हणत रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे आसूड ओढले.

    मुंबईच्या साकिनाक्यातील मॅनहोल दुर्घटना प्रकरणी पीडित कुटुंबाची आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली. या भेटीनंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवार म्हणाले, ‘मुंबईला किती अधिकाऱ्यांची गरज होती आणि किती अधिकारी देण्यात आले, याचा अभ्यास केला पाहिजे. पालिकेचे मोठे अधिकारी हे कनिष्ठ अधिकाऱ्यांवर प्रकरण ढकलून मोकळे होत आहेत. हे योग्य नाही. बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. वर्षभरात मॅनहोलवर जाळी लावणे, गटार साफ करणे यासाठ अडीचशे कोटी रुपये महापालिका खर्च करत असते. अडीचशे कोटी खर्च करूनही जाळ्या व्यवस्थित लावल्या जात नाहीत’.

    ‘जून महिन्यात पाऊस येतो, त्यामुळे मे महिन्यात सर्व कामे व्हायला पाहिजे होते. दुर्दैवाने ते काम झालं नाही. तर हे अयोग्य आहे. मॅनहोलला शंभर टक्के जाळ्या लावण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. मग आतापर्यंत जाळ्या का लावल्या नाहीत? दरवर्षी सहा ते सात जण मॅनहोलमध्ये पडून मृत्यूमुखी पडतात. या घटनेला महापालिका जबाबदार आहे. पालिकेवरील सत्ताधारी जबाबदार आहेत. सामान्य लोक मॅनहोलमध्ये पडत आहेत. लहान मुलांच्या अंगावर झाडे पडत आहेत. त्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम हे विधानसभेत येऊन थट्टा करत आहेत. हे सरकार निर्लज्ज झालं आहे. यांना गरीबांचं पडलं नाही, असं आमचं ठाम मत आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांसहित इतर अधिकाऱ्यांनाही दोषी धरलं पाहिजे, असं म्हणत रोहित पवार यांनी महायुती सरकावर टीका केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif