Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»निवडणूक आयोग हा भाजपचा मित्रपक्ष आहे!
    राजकारण

    निवडणूक आयोग हा भाजपचा मित्रपक्ष आहे!

    एकाच वेळी ९० लाख मतं डिलिट केल्याचा आरोप
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 4, 2026No Comments300 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    देशातील राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. सकाळी १० वाजेपर्यंतच्या प्राथमिक कलानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर तामिळनाडूत टीव्हीके १०६ जागा, पुद्दुचेरीत भाजप २२, आसाम भाजप ९० जागांवर आघाडीवर आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक गंभीर आरोप केला आहे.

    संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीतील विधानसभा निवडणुकांबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजपवर एकाच वेळी ९० लाख मत डिलिट केल्याचा आरोप केला आहे. तसेच निवडणूक आयोग हा भाजपचा मित्रपक्ष आहे, अशीही टीका केली आहे.

    सुरुवातीचे कल पोस्टल मतदानाचे होते. आता हळूहळू मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आपल्याला निकाल काय लागणार हे पाहण्यासाठी भरपूर वेळ आहे. पश्चिम बंगालमध्ये यावेळी भाजप स्पर्धेत आहे किंवा टक्कर देतंय. ममता बॅनर्जी यांना शह देण्यासाठी निवडणूक आयोग, भाजप आणि मोदी-शाह यांनी जवळपास ९० लाख मत मतदार यादीतून काढली. जेव्हा एकाच वेळी ९० लाख मत डिलिट केली जातात, त्याचा परिणाम निकालावर होतो, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

    मतदारांनी अद्याप कौल दिलेला नाही. ठिकठिकाणी सुरुवातीचे कल आहेत. मतमोजणीच्या २० ते २२ फेऱ्या सुरु असतात. शेवटच्या दोन किंवा तीन फेऱ्यांमध्येच निकाल लागतात. सध्या हे जे निकाल येतात ते सुरुवातीचे कल आहेत. आपल्याला थोडं थांबावं लागेल. २० ते २५ फेऱ्या चालतात आणि त्यानंतर निकाल लागतात. तुम्ही पहिल्या दुसऱ्या फेरीत हे निकाल सांगू शकत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांना दुसरं काम काय, निवडणुकीत तळ ठोकणं हेच त्यांचं काम आहे. देशात किंवा महाराष्ट्रात मुलींवर अत्याचार होतात, भ्रष्टाचार होतात, महागाई वाढली, नोकऱ्या नाहीत, त्या संदर्भात तळ ठोकून कोणी काम करत नाही. पण एखाद्या राज्यात निवडणुका आल्या की मोदी शाहांचं संपूर्ण सरकार हे तळ ठोकूनच बसतं. तसे ते बसले. देशाच्या हिताचं विकासाचं काम त्यांच्या दृष्टीक्षेपात आहे असं मला तरी वाटत नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले

    निवडणूक आयोग हा भाजपचा मित्रपक्ष आहे. ते असतील तर काहीही करु शकतात. पश्चिम बंगालमध्ये काहीही होऊ शकतं. जेव्हा भाजपला निवडणुका जिंकायच्या असतात, तेव्हा ते हे सर्व हातखंडे वापरतात. ९० लाख मतदार कापले, सीसीटीव्ही गायब करणे, वीज कापणे अजूनही बरेच प्रकार ते करतात. पश्चिम बंगलामध्ये खूप मतमोजणी बाकी आहे. राहुरी आणि बारामती या पोटनिवडणुका प्रतिकात्मक आहेत. तिथे कोणीही उमेदवार दिलेला नाही. या ठिकाणी अपक्ष लढत असल्याने निवडणुका होत आहेत. राहुरीत राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे, असेही संजय राऊतांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भाजप कार्यालय फोडलं : १५-२० हल्लेखोरांचा हल्ला!

    May 12, 2026

    तामिळनाडूत पुन्हा ट्विस्ट : अण्णाद्रमुक पक्षात फुट!

    May 12, 2026

    लाडकी बहीण योजनेने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले!

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif