उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क;
उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. मामानेच आपल्या दोन चिमुकल्या भाचांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. रक्षाबंधनाच्या एक दिवस आधीच ही घटना घडली असून, त्यांच्या बहिणीने आपले दोन भाऊ गमावल्यावर एकच आक्रोश केला आहे. की, आता मी राखी कोणाला बांधू…? आपल्याच बहिणीच्या दोन चिमुकल्या मुलांची हत्या केली. ज्या भावाला इतकी वर्ष राखी बांधली त्यानेच हा घात केला.
सविस्तर वृत्त असे की, फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसारा गावात राहणाऱ्या रामकिशोर यांना दोन मुलं आहेत. सात वर्षांचा कृष्णा आणि पाच वर्षांचा दिव्यांश एका खासगी शाळेत शिकत होते. रामकिशोर यांची पत्नी कृष्णावतीचा भाऊ महेंद्र प्रताप हा गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या बहिणीकडेच राहत होता. तो आपल्या भाच्यांना शाळेत ने आण करायचा. घटनेच्या दिवशी देखील तो भाच्यांना शाळेत घेऊन जायला निघाला आणि त्यानंतर घरी परतलाच नाही.
रामकिशोर यांनी आपल्या मेहुण्याविरोधात मुलांचं अपहरण केल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता. दोन मुलांचे मृतदेह कालव्यात आढळून आले आहे. पोलिसांनी कुटुंबियांना याबाबत सांगताच त्यांना मोठा धक्का बसला. या मुलांना एक मोठी बहीण देखील आहे. मुलं घरी परत न आल्याने ती आपले भाऊ घरी सुरक्षित परत यावेत म्हणून सतत प्रार्थना करत होती. पण तसं झालं नाही.
मुलांच्या आईने कधी विचारही केला नव्हता की ज्या भावाला गेल्या कित्येक वर्ष राखी बांधली तो आपल्याच मुलाचा असा प्रकारे जीव घेईल. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रक्षाबंधनाच्या आधीच अशी घटना घडल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस अधिक तपास करत असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.