
मकर संक्रांत विशेष लेख
आज मंगळवार दि. १४/०१/२०२५ या दिवशी मकरसंक्रांतीचा पुण्यकाल.. या मुहुर्तावर हा सण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत साजरा होणार आहे. प्रत्येकजण या सणाची आतुरतेने वाट बघत आहे. आपआपल्या परीने तयारी करत आहे. या संक्रांतीच्या सणात प्रत्येक मानव हा आपले शेजारी, मित्र, नातेवाईक, परिचयाचे व्यक्ती यांना तिळगुळ देतो व गळाभेट घेतो, त्याचप्रमाणे तो एवढ्यावरच थांबत नाही, तर त्यांना तिळगुळ दिल्यानंतर वर्षभर काय तर आयुष्यभर कधीही माझ्याशी न भांडण्याचे वचन घेत असतो, व समोरच्याही व्यक्तीला तिळगुळ घेतांना ते वचन पाळावेच लागते.
परंतु हे वचन वर्षभर, आयुष्यभर खरोखरचं पाळले जाते का? या गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आजच्या धकाधकीच्या जीवनात जर डोकावून बघीतले तर प्रत्येक व्यक्ती हा स्वार्थी, मतलबी झालेला आहे. कारण महागाईच आकाशाला गवसणी घालत आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरातील, कुटुंबातील सदस्यांचे पालन-पोषण करणे, त्यांची सर्व प्रकारची जबाबदारी पूर्ण करणे, त्यांचे महागडे शिक्षण पूर्ण करणे, क्लास, शिकवण्या ई. चे त्यांचे खर्च पेलणे, हे जिकरीचे झालेले आहे.
त्याचप्रमाणे, इतकेच नव्हे तर आजच्या या धकाधकीच्या जीवनात मानव आपल्या जन्मदात्या आई – वडीलांनाच विसरून गेलेला आहे. आई – वडील आपल्या मुलांना जन्म देतात, हे जग दाखवितात, त्याचप्रमाणे त्यांच्यावर लहानपणापासून त्यांच्या कपड्या लत्यांवर, शिक्षणावर, खाण्या पिण्यावर पाण्यासारखा पैसा खर्च करतात, व त्यांनाच आजच्या वर्तमान काळातील, २१ व्या शतकातील, संगणकीय युगातील मुले विसरतात.
मुलगा जोपर्यंत आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत त्याचे संगोपन करणे, त्याला सांभाळणे हे प्रत्येक आई – वडीलांचे कर्तव्य असते. व एकदा का मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिला की, त्या दिवसापासून त्याचे आई – वडील मरेपर्यंत त्यांचा सांभाळ करणे, त्यांचे संगोपन करण्याची सर्वस्व जबाबदारी ही मुलाची असते. परंतु एकदा का मुलगा बायकोच्या पदरात अडकला की तो आपल्या जन्मदात्या आई – वडीलांनाच विसरतो व एकतर त्यांच्या पासून विभक्त होतो किंवा त्यांची रवानगी वृध्दाश्रमात किंवा आश्रमात करतो अशा संततीला म्हणावे तरी काय? त्यापेक्षा अशी संतती जन्माला न घातलेलीच बरी व मुलं न झालेलेच चांगले असो..
परंतु माझ्या मते, आपल्याला सर्वप्रथम आई – वडीलच महत्त्वाचे वाटावयास हवे. कारण त्यांच्याच मुळे तर आपण हे जग बघत असतो.

चाळीसगाव, जि. जळगाव.
मो. ९८९०७०३४८५

