जळगावात तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव (Jalgaon) शहरातील समता नगर (Samata Nagar) भागात राहणाऱ्या तरुणाने महाबळ (Mahabal) परिसरातील एका बांधकामाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या (suicide) केली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात (Ramanandnagar Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कांतीलाल मोहन पवार असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे. कांतीलाल पवार हा आई, पत्नी आणि तीन वर्षाचा मुलगा यांच्यासह वास्तव्याला होता. हातमजुरीचं काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. मंगळवार 6 डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता महाबळ येथून आईसोबत येत असताना तो आईला दुकानात जातो, असं सांगून गेला.

त्यानंतर महाबळ परिसरातील त्र्यंबकनगरातील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. या घटनेत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केलं.

कांतीलालने आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप समजू शकले नाहीय. कांतीलाल हा एकुलता एक भाऊ असल्याने बहिणीने रूग्णालयातच प्रचंड आक्रोश केला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.