३० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव ; शहरातील नाथवाडी येथील ३० वर्षीय तरूणाने राहत्या घरात मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राहुल विजय चौरसिया वय 30 राहणार नाथ वाडा सिंधी कॉलनी जळगाव असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, राहूल चौरसिया हा तरूण आई व लहान भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. राहूलचे नवीन बसस्थानकाच्या बाजूल असलेल्या भज्जे गल्ली फळ विक्रीचे दुकान आहे. फळ विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. शनिवार ५ मार्च रोजी रात्री राहूल जेवण करून झोपला होता. मध्यरात्री घरात सर्वजण झोपलेले असता गळफास घेवून आत्महत्या केली.

हा प्रकार त्याचा भाऊ हर्षल यांच्या लक्षात आल्याने घटना समोर आली. त्याला तातडीने खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. निळकंठ महाजन यांनी मयत घोषीत केले. सकाळी ११ वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी सचिन मुढे व शांताराम पाटील करीत आहे. मयताच्या पश्चात आई किरण व भाऊ हर्षल असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.