Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»बापरे तब्बल ३६०० कोंबड्यांचा अचानक मृत्यूने खळबळ!
    महाराष्ट्र

    बापरे तब्बल ३६०० कोंबड्यांचा अचानक मृत्यूने खळबळ!

    पोल्ट्री व्यवसायिकांचे लाखोंचे नुकसान : कारण अस्पष्टच!
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 17, 2026No Comments292 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पुणे आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथे एका पोल्ट्री शेडमधील तब्बल ३६०० बॉयलर कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांसह नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, लाखणगाव येथील पोल्ट्री व्यावसायिक संतोष पोंदे यांच्या पोल्ट्री शेडमध्ये सुमारे ३७०० बॉयलर कोंबड्या होत्या. नेहमीप्रमाणे सायंकाळी खाद्य टाकण्यासाठी ते शेडमध्ये गेले असता, कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्या. या धक्कादायक घटनेत तब्बल ३६०० कोंबड्यांचा मृत्यू झाला असून केवळ सुमारे १०० कोंबड्या जिवंत राहिल्या आहेत.

    अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांचा मृत्यू होणे ही अत्यंत दुर्मिळ घटना असल्याने प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागालाही या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी लागणार आहे.

    कोंबड्यांच्या मृत्यूमागे नेमके कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव, खाद्यामध्ये झालेली विषबाधा, हवामानातील बदल किंवा इतर काही कारणे याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, तपासणी अहवाल आल्यानंतरच याबाबत स्पष्टता येणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif