ज्योतिष्यानेच सांगितलं शिंदे सरकार पडणार ? – जयंत पाटील

0

 

मुंबई ; राज्यात मविआ सरकार होती तेव्हा भाजप चे अनेक नेते रोज सरकार कोसळण्याचे भाकीत करायचे. पण आता शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अवघे काहीच दिवस झाले तोवर हे सरकार किती दिवस टिकणार या चर्चा जोर धरू लागल्या आहे. आणि आता शिंदे सरकार पाडण्यासाठी भविष्यवाणीचाही आधार घेतला जात असल्याचे समोर आले आहे. खुद्ध राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सरकार सहा महिन्यात पडेल असं एका ज्योतिष्याने सांगितले आहे, असा दावा केला आहे. विशेष म्हणजे, जयंत पाटलांनी हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच सांगितले.सहा महिन्यात शिंदे आणि फडणवीस सरकार पडणार आहे, असं आपल्याला एका ज्योतिषीने सांगितले आहे असा दावा जयंत पाटलांनी केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर हे वक्तव्य पाटील यांनी केलं आहे. मात्र शरद पवार यांनी आपला ज्योतिष्यावर विश्वास नसल्याचे स्पष्ट केले आहे.

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसची वाय बी चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व दिग्गज नेते आणि पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार यांनी आपल्या आमदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. यापैकी सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे, हे सरकार सहा महिनेच टिकेल. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, अशी सूचना शरद पवारांनी आमदारांना दिली. शरद पवार यांच्या दाव्यानुसार ज्या आमदारांना मंत्रिपदाची महत्त्वकांक्षा आहे आणि त्यांना मंत्रिपद मिळालं नाही तर पुन्हा ते काही दिवसांत स्वगृही परतण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नव्याने स्थापन झालेलं सरकार पुढच्या काही महिन्यांमध्ये सहज कोसळण्याची शक्यता आहे.

शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले आहे. अजूनही या सरकारचा खातेवाटप बाकी आहे. पण, त्याआधीच हे सरकार सहा महिन्यात कोसळले जाणार असे भाकित राजकीय वर्तुळात वर्तवले जात आहे. राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जयंत पाटील यांनी शिंदे सरकारबद्दल भविष्यवाणी सांगितली.

Leave A Reply

Your email address will not be published.