लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता शिवसेना पक्षात मोठे बदल करण्याच्या तयारीत आहेत. ‘काम करतील तेच पदावर राहतील’ असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना डच्चू दिला जाणार आहे. राज्यातील सर्व ४३ हजार गावांमध्ये शिंदेसेनेचं अस्तित्व पोहोचवण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवलं आहे. आता निवडणुका नसल्याने एकनाथ शिंदेंचे पूर्ण लक्ष पक्षवाढीवर असून ते स्वतः मंत्री आणि आमदारांच्या कामाचा आढावा घेणार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्याकडून मागच्या आठवड्यामध्येच पुण्यातील शिवसेनेची संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली होती. यामाध्यमातून त्यांनी पक्षामध्ये काम न करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. जे काम करतील तेच पदावर राहतील. जे काम करणार नाहीत त्यांना पदावरून काढून टाकण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. ज्यांच्याकडे पद आहे त्यांनी पक्ष संघटना वाढवण्यासाठी काम केलेज पाहिजे असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहे.

