“हिंदूंचा कोणताही देव ब्राह्मण नाही”; कुलगुरूंचे विधान चर्चेत

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (Jawaharlal Nehru University) म्हणजेच जेएनयू नेहमी चर्चेत असते. जेएनयूच्या (JNU) कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी (Shantishree Dhulipudi) यांनी केलेल्या एका विधानामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

भगवान शंकर शूद्र 

शांतीश्री धुलीपुडी (Shantishree Dhulipudi) यांनी हिंदू देव-देवतांबाबत आपले विचार मांडलेत. “हिंदू देव-देवता उच्च जातीचे नाहीत. भगवान शंकरदेखील अनुसूचित जाती-जमाती म्हणजेच शूद्र असू शकतात. मानवजातीच्या विज्ञानानुसार देव उच्च जातीचे नाहीत”, असं त्या म्हणाल्या आहेत. देशात सध्या सुरु असलेल्या धार्मिक तेढ आणि हिंसाचाराबाबत त्यांनी आपलं मत मांडलं.

 ..हे प्रतिगामी असण्याचं लक्षण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत आंबेडकरांचे लैंगिक न्यायाबद्दलचे विचार: समान नागरी संहिता डीकोडिंग या विषयावर व्याख्यान देताना कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी यांनी हे विधान केलं. शिवाय “मनुस्मृतीत महिलांना शूद्रांचा दर्जा देण्यात आला आहे. महिलांना त्यांच्या वडिलांकडून किंवा पतीकडून जात मिळते. हे प्रतिगामी असण्याचं लक्षण आहे”, असंही त्या म्हणाल्या आहेत.

कोणताही देव ब्राह्मण नसतो

अनेकांना मानवजातीच्या विज्ञानानुसार आपल्या देवांची उत्पत्ती माहित असावी. कोणताही देव ब्राह्मण नसतो, सर्वोच्च क्षत्रिय असतो. भगवान शंकर स्मशानभूमीत बसल्यामुळे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचे असावेत. शंकराच्या गळ्यात साप असतो. अंगावर कपडेही कमी कपडे असतात, असंही शांतीश्री धुलीपुडी म्हणाल्या आहेत.

हिंदू धर्म हा धर्म नाही

मानवजातीच्या शास्त्रानुसार माता लक्ष्मी, शक्ती अगदी भगवान जगन्नाथही उच्च जातीतून आलेले नाहीत. भगवान जगन्नाथ हे खरे तर आदिवासी वंशाचे आहेत. मग आजही आपण हा भेदभाव का सुरू ठेवतोय जो अत्यंत अमानवी आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा आपण पुनर्विचार करत आहोत हे फार महत्वाचे आहेत. हिंदू धर्म हा धर्म नाही, ती जीवनपद्धती आहे, असंही त्या म्हणाल्यात.

कोण आहेत शांतीश्री धुलीपुडी ?

शांतीश्री धुलीपुडी या सध्या जेएनयूच्या कुलगुरु म्हणून कार्यरत आहेत. याआधी त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्या प्राध्यापिका होत्या. शांतीश्री धुलीपुडी पंडित या पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या राजकारण आणि लोकप्रशासन विभागात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्याकडे अध्यापनाचा मोठा अनुभव आहे. तसंच त्या जेएनयूच्या माजी विद्यार्थिनीदेखील आहेत. जेएनयूच्या कुलगुरूपदी पहिल्यांदाच एका महिलेला स्थान मिळाला आहे. त्या जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.