Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्राची सेवा!
    जळगाव जिल्हा

    शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्राची सेवा!

    शैक्षणिक प्रकल्प ठरेल दिशादर्शक : महामंडलेश्वर स्वामी जनार्दन महाराज
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 27, 2026No Comments50 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    बुद्धिमान आणि संस्कारशील युवक ही देशाची खरी संपत्ती आहे. धर्माचे कार्य करताना शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्राची सेवा करणारा तरुण घडावा, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, असे प्रतिपादन महामंडलेश्वर स्वामी जनार्दन महाराज यांनी केले. नोबेल फाउंडेशन आणि सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या खानदेश स्तरीय प्रवेश परीक्षेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

    या उपक्रमांतर्गत 50 पेक्षा अधिक निवडक विद्यार्थ्यांना विविध परीक्षांचे विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था देखील पूर्णपणे मोफत असणार आहे. या निवडीसाठी जळगाव, धुळे आणि नंदुरबार अशा तीन केंद्रांवर प्रवेश परीक्षा पार पडली, ज्यात 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला आमदार राजूमामा भोळे, उपमहापौर मनोज चौधरी, शिक्षणाधिकारी निलेश पाटील, नगरसेवक नरेंद्र पाटील, ग्लोबल मिशन स्कूलचे चेअरमन मनोहर पाटील, नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

    मान्यवरांच्या हस्ते प्रश्नपत्रिकांचे विमोचन करण्यात आले. आमदार राजूमामा भोळे यांनी या प्रकल्पाचे कौतुक करताना म्हटले की, हा प्रकल्प जळगाव जिल्ह्यासाठी दिशादर्शक असून, या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयदीप पाटील यांनी तर आभार रमेश पाटील यांनी मानले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र पाटील, अक्षय देवरे, विवेक साळुंखे यांच्यासह स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026

    ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif