Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»“..तर मोदी – अमित शहांवर अटकेची टांगती तलवार”
    राजकारण

    “..तर मोदी – अमित शहांवर अटकेची टांगती तलवार”

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 16, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेहमी चर्चेत असतात . आता तर ते  यांच्या आगामी पुस्तकाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. उद्या (17 मे) प्रकाशित होणाऱ्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संबंधित स्फोटक दावे केले आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी 100 दिवस आर्थर रोड कारागृहात असताना राऊत यांनी हे पुस्तक लिहिले. या पुस्तकातील ‘राजा का संदेश साफ है’ हे प्रकरण विशेष चर्चेत आहे, ज्यात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी गुजरात दंगल प्रकरणात मोदी आणि शाह यांना कशी मदत केली, याची रंजक कहाणी आहे.

     

    सीबीआय चौकशीचा ससेमिरा

    2002 च्या गुजरात दंगलीनंतर अमित शाह अडचणीत सापडले होते. सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे लागला होता, आणि तडीपारीची कारवाई झाली होती. पुस्तकात राऊत दावा करतात की, शाह यांना फक्त एकच व्यक्ती वाचवू शकते, आणि ती म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. एका दुपारी शाह आपल्या मुलासह, जय शाह यांच्यासोबत, मुंबई विमानतळावर उतरले आणि थेट मातोश्रीकडे निघाले. मात्र, मातोश्रीच्या सुरक्षेमुळे त्यांना कलानगरच्या गेटवर अडवण्यात आले. दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रयत्न करून शाह बाळासाहेबांना भेटले.

     

    दर्दभरी कहाणी

    शाह यांनी बाळासाहेबांना गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा भोगत असल्याची दर्दभरी कहाणी सांगितली. “तुम्ही बोललात, तर न्यायमूर्ती तुमचं ऐकतील,” असं शाह म्हणाले. बाळासाहेबांनी चिरूटाचा झुरका घेत, मनोहर जोशी यांच्या फोनवरून संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला आणि म्हणाले, “तुम्ही कोणत्याही पदावर असाल, पण तुम्ही हिंदू आहात हे विसरू नका.” या एका फोनमुळे शाह यांच्या राजकीय आणि वैयक्तिक अडचणी दूर झाल्या, असा दावा राऊत यांनी केला आहे.

     

     

    मूक संमती

    पुस्तकात शरद पवार यांच्याबद्दलही एक खळबळजनक दावा आहे. गुजरात दंगलीदरम्यान नरेंद्र मोदी तत्कालीन मुख्यमंत्री होते, आणि केंद्रातील यूपीए सरकार त्यांच्याविरोधात होते. सीबीआय चौकशीची टांगती तलवार मोदींवर होती, आणि त्यांना अटक होण्याची शक्यता होती. यावेळी शरद पवारांनी कॅबिनेटमध्ये परखड मत मांडले की, “लोकशाहीत निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला अटक करणे योग्य नाही.” या भूमिकेला मूक संमती मिळाली, आणि मोदींची अटक टळली.

     

     “असुरी पद्धतीने” 

    याशिवाय, अमित शाह यांना जामीन मिळवण्यासाठीही पवारांनी सूत्रे हलवली. मोदींच्या विनंतीवरून पवारांनी शाह यांना एका प्रकरणात जामीन मिळवून दिला, असा दावा पुस्तकात आहे. मात्र, राऊत प्रश्न उपस्थित करतात की, या उपकारांचे स्मरण मोदी आणि शाह यांनी किती ठेवले? विशेषतः, शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी त्यांनी “निर्घृण” वर्तन केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी पुस्तकात लिहिले आहे की, गुजरात दंगलीदरम्यान संपूर्ण देश मोदींविरोधात असताना शिवसेना आणि ‘सामना’ त्यांच्या पाठीशी उभे राहिले. बाळासाहेबांनी चौकटीबाहेर जाऊन शाह यांना मदत केली. परंतु, याच मोदी आणि शाह यांनी पुढे शिवसेनेची “असुरी पद्धतीने” फोड केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. हा विश्वासघात ठाकरे कुटुंब आणि शिवसैनिकांसाठी धक्कादायक होता, असे राऊत म्हणतात.

     

    ‘नरकातला स्वर्ग’

    ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक प्रकाशनापूर्वीच चर्चेत आले आहे. पुस्तक हाती लागल्यानंतर त्यातील स्फोटक दाव्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. आता अमित शाह आणि भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राऊत यांच्या दाव्यांनी राजकीय समीकरणे बदलतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

     

    भाजप काय उत्तर देईल.. 

    ‘नरकातला स्वर्ग’ हे केवळ संजय राऊत यांचे कारागृहातील अनुभव नाही, तर भारतीय राजकारणातील अनेक गुपिते उलगडणारे पुस्तक आहे. गुजरात दंगलीपासून ते बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या भूमिकेपर्यंत, या पुस्तकात राजकीय इतिहासाच्या एका महत्त्वाच्या कालखंडाचा आढावा घेण्यात आला आहे. संजय राऊत यांचे हे पुस्तक राजकीय चर्चांना नवे वळण देण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी केलेल्या मदतीच्या कहाण्या आणि त्यानंतरच्या विश्वासघाताच्या भावना या पुस्तकातून समोर येतात. आता या दाव्यांवर भाजप काय उत्तर देईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

    Amit shah Narendra Modi Sanjay Raut sharad pawar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    बंडाची तलवार म्यान?

    June 6, 2026

    सर्वसामान्यांचा वारकरी..!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif